एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात कामे झाली नाही केवळ घोटाळे झाले. त्यांच्या काळातील आरोग्यमंत्र्यांचे कमी काळात किती घोटाळे पुढे आले हे आपल्याला माहिती आहे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तर शिंदेंच्या काळातील घोटाळ
.
दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, जे घोटाळेबाज मंत्री आहेत त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी भाजपचा विरोध होता. त्यामध्ये त्याकाळातील आरोग्यमंत्री एक आहेत. औषधीमध्ये जर घोटाळा होत असेल तर हे कसले राज्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर हे घोटाळे थांबवणार असतील बाहेर काढणार असतील तर त्यांचे आम्ही नक्की स्वागत करू.
कोकाटेंना संधी दिली जातेय
संजय राऊत म्हणाले की, माणिकराव कोकाटे कायद्याने अपात्र ठरलेले आहेत. त्यांची मंत्रिपद टिकवण्यासाठी धरपड सुरू आहे. सुनील केदार यांची 24 तासात आमदारकी गेली. उत्तरप्रदेशमध्ये आझम खान यांची आमदारकी भाजपने घालवली. पण कोकाटेंना संधी दिली जात आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे.
कोकाटे, मुंडेंना अभय दिला जातोय
संजय राऊत म्हणाले की, माणिकराव कोकाटे असो की धनंजय मुंडे या दोघांनाही सरकारकडून अभय दिला जात आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण अजूनही आमचा न्याययंत्रणेवर व्यवस्थेवर विश्वास आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे त्यांना न्यायालय सोडणार नाही.
विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगणार
संजय राऊत म्हणाले की, विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गट आपला हक्क सांगणार आहे. आमदारांची संख्या जरी कमी असली तरी नियमात आणि घटनेते असे कुठेही लिहलेले नाही ही विरोधी पक्षनेत्याशिवाय विधानसभा आणि संसद चालावी. शिवसेनेचे विधानसभेत 20 चे संख्याबळ आहे. पूर्वी यापेक्षाही कमी आमदार असताना विरोधी पक्षनेतेपद मिळालेले आहे. आमचे एकत्रित संख्याबळ पाहिले तर ते 50 पर्यंत जात आहे.
अध्यक्ष आमची भूमिका मान्य करतील
संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष काल आणि आज तेच आहे. त्यांना घटना संविधान लोकशाहीबद्दल नक्कीच चाड असावी. ते आमची विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका मान्य करतील.
दिशा ठरवण्यासाठी बैठक
ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली आणि आज खासदारांची बैठक पार पडणार आहे. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आहे तर पुढच्या काही दिवसांमध्ये संसदेचेही अधिवेशन आहे, आमदार-खासदार यांना दिशा मिळावी म्हणून त्यासाठी ठाकरे गटाने बैठक बोलवल्या आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
पुन्हा मोतोश्रीच्या दारात उभे रहावे लागेल
संजय राऊत म्हणाले की, दिल्लीच्या मोघलाईबरोबर हातमिळवणी करत महाराष्ट्र बरबाद करायचा प्रयत्न करत आहे, त्यांना थांबविण्याची ताकद आई जगदंबेने आम्हाला दिली आहे. तुमचे फडफडणे हे सत्ता असेपर्यंत आहे. एक दिवस पुन्हा मातोश्रीच्या दारावर तुम्हाला उभे रहावे लागणार आहे.