मनमाडमध्ये सुरू असलेल्या ३५व्या राज्य अजिंक्यपद किशोरी गटातील महिलांच्या कबड्डी स्पर्धेत बाद फेरीत नाशिक शहर, पिंपरी-चिंचवड, सांगली व परभणीच्या महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. अंतिम सामने गुरुवारी (दि. २७) होणार आहे. यासह मुलांच्या साखळी स्पर
.

महिलांच्या बाद फेरीत पिंपरी-चिंचवडने मुंबई उपनगर पूर्वचा ५९-२५ असा पराभव केला. सांगली संघाने नाशिक ग्रामीणचा ३९-३२ असा पराभव केला. नाशिक शहर संघाने पुणे ग्रामीणचा २५-२२ असा निसटता पराभव केला. परभणी संघाने जालना जिल्ह्याचा ५६-२७ असा एकतर्फी पराभव केला. स्पर्धेचा समारोप २७ फेब्रुवारीस ललवाणी ग्राउंडवर होणार आहे. चार मॅट ग्राऊंडवर विद्युत झोतात प्रेक्षकांसाठी उभारण्यात आलेल्या विशेष गॅलरी सुविधेसह सामन्यांचे संयोजन राज्याचे कोषाध्यक्ष मंगल पांडे, जिल्हा असोसिएशनचे राजाभाऊ पगारे, मोहन गायकवाड, डॉ. शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समितीने केले आहे. यासह शहरातील अनेक क्रीडाप्रेमी परिश्रम घेत आहेत.
पुरुषांच्या बाद फेरीत नाशिक शहरने सिंधुदुर्गचा ४७-१९, कोल्हापूरने बीडचा ४४-३३, उस्मानाबादने पुणे ग्रामीणचा ३७-३१, ठाणे ग्रामीणने रायगडचा ५६-४१, परभणीने नाशिक ग्रामीणचा ५८-३६ असा पराभव केला. पुरुषांच्या बाद फेरीत नांदेडने हिंगोलीचा ४०-२१, पालघरने लातूरचा ४६-३१, नंदुरबारने जळगावचा ४९-२८, पुणे शहरने सोलापूरचा ५६-२८, सांगलीने धुळ्याचा ४६-३८, रत्नागिरीने मुंबई शहर पूर्वचा ५६-२८ तर औरंगाबादने साताऱ्याचा ५०-३१ असा पराभव केला. अहिल्यानगरने मुंबई शहर पश्चिमचा ४३-४०, नंदुरबारने नाशिक शहरचा ४७-१९, असा पराभव केला.